नगर (प्रतिनिधी) - मनपाच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने एक वर्षानंतर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसात त...
Archive Pages Design$type=blogging
नगर (प्रतिनिधी) - मनपाच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने एक वर्षानंतर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसात ती बंद केली. या त्रासापासून वाचण्यासाठी छोट्या विक्रेत्यांनीही आता 'मोबाइल' (फिरत्या) व्यवसायाचा पर्याय शोधला आहे. मात्र, वाहतुक कोंडीची नवी समस्या यामुळे निर्माण झाली आहे. लालटाकी परिसरात असणाऱ्या न्यू आर्टस् कॉलेज तसेच रेसिडेन्शिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रवेशद्वारावर रिक्षांमध्येच खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येते, छोट्या टपऱ्याही येथे आहेत. अतिक्रमण विभागाचे पथक पुन्हा या भागात मोहीम राबवण्यासाठी आले, तर तातडीने रिक्षा सुरू करून घेऊन जाणे वा टपरी उचलून नेणे विक्रेत्यांना सहजशक्य होत आहे. या भागातील काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी मात्र अतिक्रमण विभागाचे पथक पुन्हा येण्याच्या शक्यतेने रस्त्याच्या कडेला खुर्चा व टेबल मांडलेले नाहीत. त्यामुळे ग्राहक हातगाडीच्या कडेला अथवा रस्त्यावरच दुचाकी उभी करून व त्यावर बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. यामुळे मात्र लालटाकी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.
COMMENTS
आज दिनांक
आपला वाचक क्रमांक
Like Us On Facebook
ADD









