नवी दिल्ली-सोशल नेटवर्कवर अनेक ठिकाणी मोबाइल नंबर देण्याच्या भारतीयांच्या सवयीचा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी गैरफायदा घेण्य...
नवी दिल्ली-सोशल नेटवर्कवर अनेक ठिकाणी मोबाइल नंबर देण्याच्या भारतीयांच्या सवयीचा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. दहशतवादी संघटनांच्या सायबर तज्ज्ञांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करायला सुरुवात केली आहे. तरुणांच्या चर्चेत लोकप्रिय असलेल्या विषयांचा वापर करुन ग्रुप तयार करायचा आणि हळू-हळू त्या ग्रुपमध्ये भारतीय तरुणांना परस्पर अॅड करायचे असे नवे तंत्र दहशतवादी वापरत आहेत. भारतीय सायबर तज्ज्ञांची टीम दहशतवाद्यांच्या नव्या खेळीचा सामना करण्याची तयारी करत आहे.
पाकिस्तानी मोबाइल नंबर वापरणारे आणि स्वतःची बनावट ओळख देणारे दहशतवादी पाकमध्ये बसूनच तरुणांच्या चर्चेतील नावांचा आणि विषयांचा वापर करुन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करत आहेत. सोशल नेवटवर्कवरुन मिळवलेले भारतीय तरुणांचे नंबर टाकून त्यांना परस्पर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले जाते आहे. उत्तर भारतात पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या भारतीय तरुणांना लक्ष्य करुन दहशतवाद्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करायला सुरुवात केली आहे.
'आयसिस'चे संकट पोहोचले दारात...
उत्तर प्रदेशच्या काही तरुणांनी पाकिस्तानी व्हॉट्सअॅप ग्रुप प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केली आहे. ग्रुपमधून बाहेर पडलो तरी पुन्हा काही दिवसांनी त्याच ग्रुपमध्ये किंवा दुसऱ्या नावाने सुरू असलेल्या पाकिस्तानी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले जात असल्याची तक्रार मुलांनी केली आहे. या प्रकरणात सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.










