नवी दिल्ली - दि. 23 ते 27 मार्च या दिवसात आलेल्या सणांमुळे बँका सलग 5 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचण...
नवी दिल्ली - दि. 23 ते 27 मार्च या दिवसात आलेल्या सणांमुळे बँका सलग 5 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागेल.
23 मार्चला होळी, 24 मार्चला धुलिवंदन, 25 मार्चला गुडफ्रायडे, 26 मार्चला चौथा शनिवार व 27 मार्चला रविवार असल्यामुळे सलग 5 दिवस बँका बंद राहणार आहेत आणि सण-उत्सवामुळे एटीएमचाही सर्रास वापर होण्यीच दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.
सलग 5 दिवस बँकांना सुट्टी असल्यामुळे याचा बाजारपेठेवरही निश्चितच दुष्परिणाम होईल. या 5 दिवसात बाजारपेठही ठप्प राहिल. तसेच कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचणी येऊ म्हणून नागरिकांनीही वेळेपु्र्वीच दक्षता बाळगणे गरजेचे आहे.










