नगर - राज्य शासनाचे प्रधान वनसंरक्षक व सामाजिक वनीकरण विभागाचे महासंचालक अतुल चड्डा यांनी नगर धावती भेट दिली असता वनश्री पुरस्कार वि...
नगर - राज्य शासनाचे प्रधान वनसंरक्षक व सामाजिक वनीकरण विभागाचे महासंचालक अतुल चड्डा यांनी नगर धावती भेट दिली असता वनश्री पुरस्कार विजेते बलभिम डोके यांनी केडगांव येथे त्यांचे स्वागत केले. यावेळी सामाजिक वनविभागाचे जिल्हा उपसंचालक चंद्रकांत तांबे, लागवड अधिकारी महादेव पोकळे आदि उपस्थिती होते.
यावेळी बलभिम डोके यांनी शास्त्रोक्त बिजारोपणाकरता तयार केलेल्या वनकाठी अतुल चड्डा यांना देवुन सत्कार केला. वनकाठी द्वारे होणार्या बिजारोपणाचे प्रात्याक्षिक दाखवले तसेच वनकाठी भेट दिली. वनकाठीची सविस्तर माहिती देताना श्री. डोके म्हणाले नगर जिल्हा परिसरात मागील तीन चार वर्षापासून वनकाठी व्दारे केलेले बिजारोपण फलदायी ठरले आहे. या बिजारोपण उपक्रमात नगरमधील शाळा, भजनी मंडळे, वारकरी सांप्रदाय, प्रवचनकार, किर्तनकार तसेच सामाजिक कार्यकर्ते उत्स्फुर्त सहभाग घेत आहे. महाराष्ट्र शासनाने संपुर्ण राज्यात शास्त्रोक्त बिजारोपण करण्यासाठी या वनकाठीचा उपयोग करावा, अशी मागणी अतुल चड्डा यांच्याकडे बलभिम डोके यांनी केली.










