नगर - संतांच्या प्रबोधनापासून समाजाने फरकत घेतली. आज संतांचे प्रबोधन एकीकडे आणि सुधारकाची चळवळ एकीकडे राहिल्याने समाजरचना मोडकळीस ...
नगर - संतांच्या प्रबोधनापासून समाजाने फरकत घेतली. आज संतांचे प्रबोधन एकीकडे आणि सुधारकाची चळवळ एकीकडे राहिल्याने समाजरचना मोडकळीस आली आहे. ब्राम्हण विद्वानांच्या आहे. हिंदू धर्मियांचा कट्टरता वाद आणि मुस्लिम धर्मियांचा कट्टरता वाद समाजास घातक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.
राजे शहाजी प्रतिष्ठान व इतिहासप्रेमी मंडळातर्फे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 22 लोकांना राजे शहाजी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे होते. महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते दादा कळमकर, अॅड.दीपलक्ष्मी म्हसे, ललिता सबनीस, सभापती हरिभाऊ कर्डिले, अप्पासाहेब कर्डिले, रवींद्र सानप आदी उपस्थित होते.
माऊली सभागृहात 24 मार्च रोजी सायं.6 वा. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
पुरस्कर्त्यांची नावे - उत्तमराव सुपेकर (बँकींग), भास्करराव नरसाळे (प्रबोधन), जयवंतराव शिंदे (समाजसेवक), प्रमिला गायकवाड (पोलिस), महेश कांडेकर (उद्योजक), बाबासाहेब भोर (संघटन), पूर्णानंद वांढेकर (अभिनेता), बेबी गायकवाड (भाषा संवर्धन), रमजान शेख (शिक्षक), रमेश इनामकर (कृषी), सचिन गांगुर्डे (संघटन), संतोष धोंडगे (प्रशासन), मोहसीन पठाण (तलाठी, सूर्य़कांत नेटके (पत्रकारिता), रभाजी सूळ (राजकीय), रविकिरण भूतकर (संघटन), प्रा.बापू चंदनशिव (मास मिडिया), डॉ.बाळासाहेब लबडे (साहित्य), सुलाबाई आदमाने (समाजसेवा), नानासाहेब कडूस, एकनाथ लांडगे (शेतीपूरक उद्योग), कानिफ गुंजाळ (शिक्षण), किरण बेरड (लघुपट).










