मुंबई - यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोल्हापूर, लातूर अहमदनगर या जिल्हा परिषदांना अनुक्रमे पहिल...
मुंबई - यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोल्हापूर, लातूर अहमदनगर या जिल्हा परिषदांना अनुक्रमे पहिले तीन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. 'पंचायतराज संस्थांना अधिक सक्षम करण्यात महाराष्ट्र राज्य अाघाडीवर आहे. आता ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांना जादा अधिकार प्रदान करून त्यांना अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम करावे,' असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रविवारी केले.
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गाैरव करण्यात आला. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी होत्या. या कार्यक्रमास ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित आदी उपस्थित होते.
'लोकसभा आणि विधानसभेइतकीच ग्रामसभाही महत्त्वाची आहे. चौदाव्या वित्त आयोगातून गावांच्या विकासासाठी १५ हजार कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी ग्रामसभा शक्तिशाली असणे गरजेचे आहे. आतापर्यंत विकासाच्या अनेक योजना गावांत राबवण्यात आल्या आहेत, पण तरीही गावांचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. हे बदलण्यासाठी नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलतांना केले.
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोल्हापूर, लातूर अहमदनगर या जिल्हा परिषदांना अनुक्रमे पहिले तीन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर), कराड (जि. सातारा) या पंचायत समित्यांना अनुक्रमे पहिले दोन, तर राहुरी (जि. अहमदनगर) मालवण (जि. सिंधुदुर्ग) या पंचायत समित्यांना तिसरा पुरस्कार विभागून प्रदान करण्यात आला. संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना एकूण काेटी ७० लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात आले.










