भारतात प्राचीन काळापासून धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात स्त्री-पुरुष समसहभाग मानला जातो इतकचे काय तर राज्यघटनेनेही स्त्री-पुरुष समान...
भारतात प्राचीन काळापासून धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात स्त्री-पुरुष समसहभाग मानला जातो इतकचे काय तर राज्यघटनेनेही स्त्री-पुरुष समानता अधिकार दिला असतांना मग तो मंदिर प्रवेशात का नाही, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी शिंदे यांनी केला आहे.
एकीकडे शनिशिंगणापूर व त्र्यंबकेश्वर येथील महिला प्रवेश मुद्दा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच त्याबाबत भूमिका स्पष्ट करीत महिलांना मंदिर प्रवेश देण्यात यावे अशी भूमिका राजस्थानमधील नागौर येथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये मांडली आहे.
हिंदू पध्दतीत पारंपारिक दृष्टीने पाहता वेदाध्ययन व पौराहित्य महिलांकडून केले जाते मग त्यांना प्रवेश नाकारण्याचे काहीच कारण नाही असे प्रतिपादनही भैयाजी शिंदे यांनी यावेळी बोलतांना दिले.










