अहमदनगर - शहरातील सांडपाण्याचा निचरा हा नेहमीच चर्चेचा विषय गेल्या काही दिवसांमध्ये बंद गटार योजना महापालिकेने हाती घेतली. शह...
अहमदनगर - शहरातील सांडपाण्याचा निचरा हा नेहमीच चर्चेचा विषय गेल्या काही दिवसांमध्ये बंद गटार योजना महापालिकेने हाती घेतली. शहरातील सर्व सांडपाणी विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे वाढून जाण्यासाठीही या बंद गटारींचा मोठा लाभ होणार आहेच. याच योजनेअंतर्गत शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या किमान 5 फुटी वाहिन्या दिल्लीगेट ते अमरधाम दरम्यान बसविण्यात आल्या. त्या सांडपाणी वाहिन्यांना वसाहतीमधून येणाऱ्या लहान वाहिन्या जोडण्यात येवून एकत्रित सांडपाणी निचऱ्याची सोय करण्यात आली.
या मोठ्या वाहिन्यांसाठी ठिकठिकाणी अडचणीच्या वेळी उपयोग व्हावा म्हणून मोठे चेंबर्स बांधम्यात आले. मात्र या चेंबर्सची झाकण जागा अद्याप उघडीच आहे. या प्रत्येक चेंबर्सची ही जागा 4 ते 8 स्क्वे.फूट या अकारात झाकणांशिवाय उघडीच आहे. रस्त्यावरुन येजा करताना जर कोणी त्यात पडले तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिवाय या उघड्या जागेतून येणारा दुर्गंध स्थानिक रहिवाश्यांना सहन करावा लागतो. आरोग्याच्या दृष्टीने तेही घातकच आहे. दुसरीकडे या बंद गटार योजनेच्या उघड्या जागेत कचराही टाकला जात आहेच ज्यामुळे या मोठ्या गटारीही तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज बांधकाम करण्यात आलेल्या बंदिस्त मोठ्या गटारीचे चेंबर काही ठिकाणी खचल्याचेही दिसते.
जर ही सर्व चेंबर्स व्यवस्थित बंद करण्यात आली तर उपलब्ध होणारी जागा दोन-तीन चाकी वाहनांचा पार्किंग म्हणून उपलब्ध होऊ शकते. ज्यामुळे रस्त्यावरची वाहन गर्दी कमी होणार आहे. या सर्व स्थितीचे निराकरण होण्यासाठी ही उघडी चेंबर्स तत्काळ बंद करणे अत्यावश्यक ठरले आहे.











