नगर - केंद्र सरकार कामगार व शेतकरी विरोधी नवनवीन कायदे आणत आहेत. भांडवलशाहीला प्रोत्साहन दणारे धोरण राबवित आहेत. स्वार्थी झलक म्हणज...
नगर - केंद्र सरकार कामगार व शेतकरी विरोधी नवनवीन कायदे आणत आहेत. भांडवलशाहीला प्रोत्साहन दणारे धोरण राबवित आहेत. स्वार्थी झलक म्हणजे मेक इन इंडिया योजना कामगारांना किमान वेतन, सुरक्षितताव मुलभूत हक्क मिळविण्यासाठी एकत्र लढावे लागेल. इतर शहरांच्या तुलनेत आपल्या शहराचा विकास झपाट्याने होणार आहेत. वातावरण सध्या बदलले आहे. कारखानदारांना आर्थिक भांडवलाइतकेच मनुष्यबळ व श्रमशक्ती महत्वाची आहे. अहमदनगरच्या औद्योगिक विकासात भरीव योगदान देण्यासाठी सर्व कामगार संघटनांनी लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली एकत्र येवून काम करावे लागेल, असे प्रतिपाद आयटीक राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ.डॉ.भालचंद्र कानगो यांनी केले.
आयटक संलग्न क्रांतीसिंह कामगार संघटनेच्या एमआयडीसीतील एव्हरग्रीन इंजिनिअरींग प्रा.लि.येथील कंपनी युनिटचे नामफलक अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कॉ.बन्सी सातपुते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कांतीसिंहचे अध्यक्ष कॉ.बहिरनाथ वाकळे, कॉ.नानासाहेब कदम, सरचिटणीस कॉ.रामदास वायस्कर, युनिट अध्यक्ष कॉ.अतुल नरवडे, उपाध्यक्ष कॉ.अशोक भगत, चिटणीस कॉ.सतीश निमसे, क्लासिक व्हीलचे कॉ.महादेव पालवे, कॉ.लहु लोणकर, कॉ.कुळधरण, जी.के.एन.चे कॉ.बाबासाहेब निर्मळ, कॉ.मिलिंद जपे, कॉ.वाळके आदि उपस्थित होते.









