अहमदनगर - महापालिकेने सादर केलेले घरगुती पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव महासभेने काल फेटाळून लावला असून त्यामुळे नागरिकांवरील घरगुती पाणीप...
अहमदनगर - महापालिकेने सादर केलेले घरगुती पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव महासभेने काल फेटाळून लावला असून त्यामुळे नागरिकांवरील घरगुती पाणीपट्टी वाढीचे संकट टळले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र व्यावसायिक व औद्योगिक पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव विरोधकांचा विरोध असतानाही मान्य करण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्यावर मात्र हा बोजा वाढला आहे.
यामध्ये आता अर्धा इंच व्यावसायिक पाणीपट्टी ५४00 रुपयांवरुन १0 हजार करण्यात आला आहे. तसेच पाऊण इंची १0८00 रुपयावरुन २0 हजार तर एक इंची पाणीपट्टी २२ हजारावरुन ४0 हजार रुपये करण्यात आली आहे तर औद्योगिक पाणीपट्ट्टी अर्धा इंचासाठी १0 हजार ८00 वरुन २0 हजार, पाऊण इंची २१ हजार ६00 वरुन ४0 हजार तर १ इंची ४३ हजार २00 वरुन ८0 हजार इतकी करण्यात आली आहे. तसेच अग्निशमन सेवेवर २ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव नामंजूर करीत फिरता दवाखाना, आरोग्य सुविधा निशुल्क करण्याच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली आहे.
मंगळवार दि. २९ रोजी स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांनी मनापाचा अर्थसंकल्प सभेत सादर केला होता यावर काल बुधवार दि. ३0 रोजी मनपाच्या अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिठासीन अधिकारी तथा महापौर अभिषेक कळमकर, उपमहापौर सौ. सुवर्णाताई कोतकर, अति. आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहरे, नगरसचिव मिलिंद वैद्य, लेखाधिकारी हितेश विसपुते, लेखापरिक्षक श्रीकांत अनारसे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या सभेसही आयुक्त विलास ढगे अनुपस्थितच होते.










