सध्याच्या जीवनात टिव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर यासारख्या यांत्रिक घटकांचा वाढता वापर आपल्या सजीव आणि जीवंत जीवन शैलीत मोठ्या प्रमाणात अत...
सध्याच्या जीवनात टिव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर यासारख्या यांत्रिक घटकांचा वाढता वापर आपल्या सजीव आणि जीवंत जीवन शैलीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करीत आहे. एकमेकांतील आवश्यक व सकारात्मक संवाद दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे. वस्तुंची देवाण-घेवाण, दळण-वळण करावे तसे नात्यातील सहज जीवन चालु आहे म्हणून संवाद हरवतांना पाश्चिमात्य संस्कृतीशी हातमिळवणी करातांना एकाच ताटात जेवण करणारं संपुर्ण कुटुंब दिसणं आता दुर्मिळ होत आहे, म्हणून मॉम-डॅड ऐवजी आई-वडील होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रपती पदक विजेते व जागतीक विश्वविक्रमवीर डॉ.अमोल बागुल यांनी केले.
आई-वडिलांनी दररोज आपल्या पाल्याच्या व्यक्तीमत्व विकासासाठी एक तास द्यावा, वॉट्सअप, फेसबुक यातुन वेळात-वेळ काढून पाल्याच्या शारिरीक व्यायाम, शैक्षणिक गुणवत्ता व कला-क्रीडा विकासाकडे लक्ष द्यावे असेही डॉ.बागुल म्हणाले.
आई-वडिलांनी दररोज आपल्या पाल्याच्या व्यक्तीमत्व विकासासाठी एक तास द्यावा, वॉट्सअप, फेसबुक यातुन वेळात-वेळ काढून पाल्याच्या शारिरीक व्यायाम, शैक्षणिक गुणवत्ता व कला-क्रीडा विकासाकडे लक्ष द्यावे असेही डॉ.बागुल म्हणाले.
प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सोनवणे यांनी वार्षिक अहवाल वाचनात प्रशालेतील दैदिप्यमान यशाचा आलेख माडंला तर सुभाष राख यांनी क्रिडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक जाहिर केली. डॉ.बागुल यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या संग्रहातील परदेशी वाद्यांच्या वादनाचे प्रात्यक्षिक दाखविले. कवीता गायन व बासरी वादनातुन बागुल यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.









