नगर - स्वत:शी प्रमाणिक राहुन नियोजन करुन सातत्यापूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परिक्षांमध्ये हमखास यश मिळते. आपल्याला जी स्पर्धा परिक्षा...
नगर - स्वत:शी प्रमाणिक राहुन नियोजन करुन सातत्यापूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परिक्षांमध्ये हमखास यश मिळते. आपल्याला जी स्पर्धा परिक्षा द्यावया ची आहे, त्या परिक्षेच्या आधी होवून गेलेल्या प्रश्नपत्रिकांचा बारकाईने अभ्यास केल्याचा निश्चितच फायदा होतो, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात एमपीएससी परिक्षेत द्वितीय आलेल्या राहुल धस यांचा अहमदनगर येथील स्टडी सर्कलच्यावतीने संचालक प्रा.उदय काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. हरिदास गुंजाळ उपस्थित होते.पुढे बोलताना श्री.धस म्हणाले की स्टडी सर्कलमध्ये केलेला अभ्यास व प्राध्यापकांचे मार्गदर्शन याचा फायदा झाला. आपण देत असलेल्या स्पर्धा परिक्षेचा अभ्यासक्रमाचे आकलन व जुन्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करुन रोज आठ तासाच्या अभ्याचे नियोजन करावे. त्यात सातत्य ठेवावे. त्याचप्रमाणे आठवड्यातून अर्धा दिवस तरी अभ्यास बाजूला ठेवून सोशल लार्ईें जगले पाहिजे. या अतिशय सोप्या गोष्टी जर पाळल्या तर एक दिवस आपण नक्कीच अधिकारी होतो, फक्त अपयशाने खचून न जाता प्रामाणिकपणे आपल्या ध्येयाकडे आपण वाटचाल करत राहिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.नगर शाखेचे संचालक प्रा.उदय काळे म्हणाले की, स्टडी सर्कलच्या विविध शाखांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी हे युपीएससी, एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊन मोठ-मोठ्या पदांवर कार्यान्वित झालेले आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. नगर शाखेच्यावतीने विध स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन केंद्रे सुरु करण्यात आलेली असून, त्याचा असंख्य विद्यार्थी मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










