गांधी यांच्या गटनेतेपदाच्या खेळीची अँड़ अभय आगरकर यांनी उडविली खिल्ली अहमदनगर: खासदार दिलीप गांधी यांच्या गटनेतेपदाच्या खेळीची अँड़ अ...
गांधी यांच्या गटनेतेपदाच्या खेळीची अँड़ अभय आगरकर यांनी उडविली खिल्ली
अहमदनगर: खासदार दिलीप गांधी यांच्या गटनेतेपदाच्या खेळीची अँड़ अभय आगरकर यांनी बालभारती असे संबोधून खिल्ली उडवली आहे. त्यांनी यावेळी कायद्याची आठवण करून दिली. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर महिन्याभरात नगरसेवकांचे गॅझेट प्रसिद्ध होते. त्यानंतर गट नोंदणीसाठी महिन्याभराची मुदत दिली जाते. गटनोंदणी विभागीय आयुक्तांकडे एकदाच होते. तशी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची गटनोंदणी सुरूवातीलाच होऊन दत्ता कावरे यांची नियुक्ती झाली आहे. ही नोंदणी करताना नऊच्या नऊ नगरसेवक विभागीय आयुक्तांसमोर उभे होते. त्यांची ओळख तपासून नोंदणी झाली आहे. आता त्यात कायद्यानुसारच बदल शक्य आहे अन्यथा नाही. अपुर्या संख्यांबळाच्या जोरावर केलेला ठराव आणि आता झालेल्या गटनोंदणीला कायद्याचे कोणतेच अधिष्ठान नाही. त्यामुळे गटनोंदणीचा आताचा प्रकार म्हणजे बालभारती आहे, अशी खिल्ली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अँड़ अभय आगरकर यांनी उडवली आहे. नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी गटनेतेपदाची सूत्रे हाती घेऊन पक्षादेश बजावला आहे. आगरकर यावर म्हणाले, गटनेताच पक्षादेश बजावून शकतो आणि ते अधिकार सुरूवातीला झालेल्या गटनोंदणीनुसार व कायद्यानुसार दत्ता कावरे यांनाच आहे. आगरकर यांच्या या भूमिकेमुळे सुवेंद्र गांधी यांच्या गटनेतेपदाला कायद्याचा किती आधार आहे, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.










