शमी गणपती मंदिरास महापौर कदम यांची भेट; अहमदनगर आज प्रत्येकाला एक ना अनेक प्रकारचा ताणतणाव आहे. त्यामुळे शांतता मिळण्यासाठी मं...
शमी गणपती मंदिरास महापौर कदम यांची भेट;
अहमदनगर

आज प्रत्येकाला एक ना अनेक प्रकारचा ताणतणाव आहे. त्यामुळे शांतता मिळण्यासाठी मंदिर हे एक चांगला पर्याय आहे. की जेथे काही प्रमाणात शांतता मिळते, त्यामुळे प्रत्येक शहरात मंदिरे असणो गरजेचे आहे. असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.दिल्लीगेट परिसरातील स्वंयभू श्री शमी गणपती मंदिराला मनपाच्या नूतन महापौर सुरेखा कदम यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शमी गणपती न्यासाचे डॉ.जयंत निसळ, सौ. शैलेजा निसळ, अण्णा नगरकर, शरद देशमुख, सुरेश देशमुख, पुजारी प्रमोद रेखी, गणोश अष्टेकर आदी मान्यवर उपस्थ्ति होते.
महापौर कदम म्हणाल्या शमी गणपती मंदिराला जुना इतिहास आहे. प्राचीन मंदिर असून संकष्टी चतुर्थीलाच आरती करण्यास मिळणो हे माझे भाग्य समजते.
शैलेजा निसळ म्हणाल्या की शमी गणपती मंदिराला एक प्राचीन परंपरा आहे शमीच्या झाडाच्या मुळापासून बनलेला गणपती आहे. सुरूवातीला या गणपतीला शेंदूर लावला असून उघड्यावर होता. नंतर त्याला जागा मिळाली, आज नगरमधील अष्टविनायकापैकी एक म्हणून शमी गणपतीला पाहयले जाते. स्वयंभू असल्याने चांगली गर्दी असते









