आनंदी जीवनासाठी शिक्षण आवश्यकच : आ. जगताप अ.नगर काशी-कापडी समाज युवा मंच सामाजिक भावनेतून चांगले काम करीत असून, गुणवंतांचा सत्कार करून...
अ.नगर काशी-कापडी समाज युवा मंच सामाजिक भावनेतून चांगले काम करीत असून, गुणवंतांचा सत्कार करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याचे काम मंच करीत आहे. गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांचा हुरूप वाढविला पाहिजे. पालकांनी पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे. शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले असून, जीवन आनंदी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
अ.नगर काशी-कापडी समाज युवा मंचाच्यावतीने १0 वी व १२ वीतील गुणवंतांचा आ. जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचाचे अध्यक्ष प्रमोद भिंगारे, अमोल आंबेकर, समाजाचे अध्यक्ष सुनील भिंगारे, दिनेश भिंगारे, बाळासाहेब वाडेकर, कार्याध्यक्ष रवींद्र भिंगारे, गुलाब भिंगारे, महेश भिंगारे, अमोल वाडेकर, तेजस भिंगारे, अंकुश भिंगारे, दिनेश वाडेकर, युवराज भिंगारे, दिलीप वाडेकर, राकेश वाडेकर, कोंडिराम उपळकर, प्रकाश वाडेकर, अक्षय भिंगारे, विनीत भिंगारे, संकेत भिंगारे, विकी भिंगारे, रमेश भिंगारे, कन्हैया भिंगारे, हिरालाल वाडेकर, दिनेश वाडेकर, राजू वाडेकर, भगवान बर्दे, राजू भिंगारे, विजय वाडेकर, गणोश भिंगारे, प्रमोद भिंगारे, स्वामी भिंगारे, सचिन गंगेकर, बबलू भिंगारे, पंकज भिंगारे, रवींद्र वाडेकर आदी उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले की, नगरमध्ये काशी-कापडी मोठा समाज आहे. सभामंडपाची समाजाने मागणी केली आहे. ही मागणी आपण मंजूर करीत आहोत. जागा निश्चित झाल्यानंतर सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून देऊ. सर्व समाजाचे समाजमंदिर बांधून देण्याकामी निधी दिला आहे, असे ते म्हणाले.
प्रमोद भिंगारे म्हणाले की, काशी-कापडी समाजाला २0 ते २५ वर्षांपासून राजकारण्यांनी झुलवत ठेवले. आ. जगताप यांनी मात्र समाजाकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या माध्यमातून समाजासाठी भरीव काम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.










