जीवनात कर्म चांगले ठेवा : इंदोरीकर करंजी ; जीवनात कर्म चांगले ठेवा : इंदोरीकरप्रत्येक व्यक्तीने जीवन जगताना आपले कर्म चांगले ठेवल...
जीवनात कर्म चांगले ठेवा : इंदोरीकर
करंजी ;
जीवनात कर्म चांगले ठेवा : इंदोरीकरप्रत्येक व्यक्तीने जीवन जगताना आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे, आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा. असे प्रतिपादन प्रबोधनकार नवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले आहे.
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र चिचोंडी येथे हनुमान मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या काल्याच्या कीर्तनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सात दिवस विदर्भकन्या ज्ञानेश्वरी दिदी यांची भागवत कथा मोठय़ा भक्तीमय वातावरणात पार पडली. काल्याच्या कीर्तनप्रसंगी आमदार शिवाजीराव कर्डिले, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे, माजी जि.प.सदस्य मोहनराव पालवे, अक्षय कर्डिले, वैभव खलाटे, भगवान महाराज मचे, गाडेकर महाराज, फासले महाराज, मिरी - तिसगाव प्रादेशिक नळ योजेनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, विविध गावचे सरपंच, उपसरपंच भक्तगण मोठय़ा संख्येने उपस्थि होते.
यावेळी इंदोरीकर महाराज यांनी तरुण तरुणींना संस्कृतीचे पालन करत सैराट होऊ नका असे आवाहन केले. राज्यातील वृद्धाश्रम बंद झाले तरच महाराष्ट्र सुरक्षित झाला असे मी म्हणेल. शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून पैशावर आता डिग्री मिळत असल्याबाबत चिंता व्यक्त केली . जीवनात संपत्ती नव्हे तर कर्माला मोठे महत्व असल्याचे ते म्हणाले. यावेळी इंदोरीकर महाराज यांनी तरुण तरुणींना संस्कृतीचे पालन करत सैराट होऊ नका असे आवाहन केले. राज्यातील वृद्धाश्रम बंद झाले तरच महाराष्ट्र सुरक्षित झाला असे मी म्हणेल. शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून पैशावर आता डिग्री मिळत असल्याबाबत चिंता व्यक्त केली . जीवनात संपत्ती नव्हे तर कर्माला मोठे महत्व असल्याचे ते म्हणाले.
या वेळी आ. कर्डिले म्हणाले, अनिष्ठ प्रथा बिघडत चाललेली तरुणाई, वाढत्या वाईट घटना यावर परखडपणे बोलण्याचे काम इंदोरीकर महाराज करत असून, समाजप्रबोधन करुन ते समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत.
आटकर यांनी चिचोंडी सारख्या गावात अध्यात्मिकतेचे एक चांगले काम हाती घेतले असल्याब्द्दल आ. कर्डिले व इंदोरीकर महाराज यांनी आटकर यांचे कौतुक केले.










