आर्थिक विषमतेचे समाजासमोर आव्हान ; तिसगाव (ता. पाथर्डी) येथे दादा पाटील राजळे स्मृती व्याख्यानमालेचे उद््घाटन करताना पर्यावरण अभ्...
आर्थिक विषमतेचे समाजासमोर आव्हान ;

तिसगाव (ता. पाथर्डी) येथे दादा पाटील राजळे स्मृती व्याख्यानमालेचे उद््घाटन करताना पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर. समवेत माजी आमदार राजीव राजळे व मान्यवर. तिसगाव : हवामान बदल,पर्यावरण बदल व आर्थिक विषमता अशा तीन स्वरुपाची आव्हाने संगणकीय युगात सार्वत्रिक चर्चेची झाली आहेत. विशेषत: निसर्ग र्हासाचा मानवी जीवनाशी सर्वार्थाने खोलवर परिणाम होत आहे, अशी खंत पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केली.
दादा पाटील राजळे स्मृती व्याख्यानमालेच्या शुभारंभप्रसंगी प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. माजी आमदार राजीव राजळे अध्यक्षस्थानी होते. नवृत्त प्राचार्य शिवाजी देवढे, जलअभियंता शिवाजी राजळे, वृद्धेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, कार्यकारी संचालक जालिंदर पवार, संचालक सुभाष ताठे, चारूदत्त वाघ आदी मान्यवर याप्रसंगी हजर होते.
दिखाऊ व अंतर्मनाला साद देणार्या दोन मुखवट्यांचा कायम उल्लेख होतो. अंतर्मनाला समाधान देणारे दूरगामी परिणामाचे रचनात्मक कार्य दिवंगत दादा पाटील यांनी वृद्धेश्वर उद्योग समूह व शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून केले. त्यामुळे परिसराचे सार्वत्रिक पर्यावरण सुखावह ठरले, असे गौरवोद्गारही देऊळगावकर यांनी काढले. प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अशोक ताठे यांनी आभार मानले.
कासार पिंपळगाव येथे वृद्धा नानी नदीवर महिलांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून साकारलेल्या बतानी बंधारा जलसाठय़ाची पाहणी करुन देऊळगावकर यांनी ग्रामस्थांशी पर्यावरणाबाबत संवाद साधला. उपसरपंच राहुल राजळे, तुषार तुपे, विक्रम राजळे, मदन म्हस्के, रंगनाथ चितळे, राधाकिसन राजळे आदी याप्रसंगी हजर होते.









