कामाची तळमळ असल्यास प्रश्न सुटतातच : महापौर कदम; अहमदनगर ; ज्या मतदारांनी आशा,अपेक्षा ठेवून लोकप्रतिनिधींना निवडून दिले. त्यांनी...
कामाची तळमळ असल्यास
प्रश्न सुटतातच : महापौर कदम;

अहमदनगर ;
ज्या मतदारांनी आशा,अपेक्षा ठेवून लोकप्रतिनिधींना निवडून दिले. त्यांनी नागरिकांची निराशा न करता त्यांचे प्रश्न मार्गी लावायला हवेत. काम करण्याची तळमळ असली की प्रश्न सुटतातच. निवडणुकीमध्ये मतदारान्ांा दिलेली आश्वासने पूर्ण करताना प्रभाग क्रमांक ८ मधील रस्ते, वीज, पाणी प्रश्नांना प्राधान्य देवून ते सोडविताना सर्वांना समान न्याय देण्याचे ध्येय उषाताईंचे आहे, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले. सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक ८ मधील निशिगंध कॉलनी ते तांबटकर मळापर्यंत ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण केले. त्याचा लोकार्पण सोहळा महापौर कदम यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कदम म्हणाल्या की, उषाताईंनी हा प्रश्न मार्गी लावला कारण नागरिकांचे प्रश्न सुटावेत, हेच त्यांचे ध्येय आहे, हे यामधून सिद्ध होते. यावेळी नगरसेविका छाया तिवारी, शोभा म्हस्के, माधवी पाठक, ज्योती शिंदे, प्रीती गोंगले, शैला सोनवणे, स्नेहल क्षीरसागर, गोरे, कराळे, राऊत, कामत मॅडम, दिगंबर ढवण, नरेंद्र कुलकर्णी, मुकुल गंधे, नितीन शेलार, शिरीष जानवे, संपत नलावडे आदी उपस्थित होते.









